#rahul gandhi # pune
RAHUL GANDHI IN PUNE : आमची सत्ता आल्यांनंतर देशातील अग्निवीर योजना बंद करणार असून, जीएसटी सुद्धा हटवण्यात येईल़ २२ लोकांना वाटलेला पैसा सर्व शेतकरीबांधवांत वाटणार आहोत. सगळ्या दलित, आदिवासी, मागासांना आरक्षण देणार असल्याची मोठी घोषणा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली़
पुणे येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जनतेला भरघोस आश्वासन दिले असून पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
देशातील ९० टक्के जनतजवळ काहीच नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही जातनिहाय जनगणना करणार आहोत़ सर्व संस्था, उद्योग व्यवसायांमधील प्रतिनिधित्वचे सर्वेक्षण करण्यासह जातनिहाय जनगणनेनंतर मराठा आणि धनगरांना सर्व मागासवर्गांना आरक्षण देणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
गरीब महिलेस एक लाख
प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यात दरवर्षी एक लाख टाकणार. गरिबी रेषेच्या खालील महिलांना ही रक्कम देणार असून, सर्व काही ‘टकाटक’ करणार असल्याचे राहुल गांधी यांनी ठोसपणे सांगितले़ शेतकरीबांधवांचे कर्ज माफ करणार. तसेच, ही कर्जमाफी एकदाच होणार नसून, त्यासाठी स्वतंत्र शेतकरी कर्जमुक्ती आयोग स्थापन करणार आहोत. आयोगाच्या सल्ल्यानुसार कर्जमाफी देणार असतानाच देशातील प्रत्येक तरुणाला पहिल्या नोकरीची गॅरंटी देणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले़ सोबतच १ लाख रुपये त्यांच्या खात्यात टाकणार असल्याचे ते म्हणाले.
पुणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आहे. तसेच, महाराष्ट्र नैसर्गिकरित्या काँग्रेसी राज्य आहे. त्यामुळे याठिकाणी आल्यानंतर आनंद वाटतो, असे राहुल गांधींनी सांगितले.
TAPORI TURAKI वो इन्सान मुझे दिखता नहीं
मग … क्काय हसायलाच पाहिजे़ नक्की वाचा. टपोरी टुरकी … TAPORI TURAKI